UPI : ३१ डिसेंबर पूर्वीच पेमेंटवर निर्बंध?

UPI : ३१ डिसेंबर पूर्वीच पेमेंटवर निर्बंध?

मुंबई : देव-घेवीच्या व्यवहारासाठी रोख पैसे न वापरता फोनमधले पेमेंट अ‍ॅप्स वापरून व्यवहार करण्याचे प्रमाण सध्या बरेचसे वाढले आहे. लोकांनाही हा पर्याय सोयिस्कर ठरतो आहे. रोख पैशाचे पाकीट सांभाळण्यापेक्षा फोनवरून पेमेंट करण सोपे होते. अगदी किरकोळ खरेदीपासून मोठ्या व्यवहारापर्यंत UPI Payment करण्याची तुम्हाला सवय असेल तर ही Breaking News तुमच्यासाठीच आहे. युपीआय पेमेंटवर सध्या बहुतेक…

Burning zappi : औरंगाबादेत ‘बर्निंग झप्पी’चा प्रयोग !

Burning zappi : औरंगाबादेत ‘बर्निंग झप्पी’चा प्रयोग !

औरंगाबाद : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या देशभर गाजत आहे, यादरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातून ‘बर्निंग झप्पी’ची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत हे दोघेही गंभीररित्या भाजले आहेत. हे दोघेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान,…

Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी

Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी

जाकार्ता : इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये १० किमी खोलीवर…

हाईड आऊट मध्ये सजली रंगतदार ‘महफिल’

हाईड आऊट मध्ये सजली रंगतदार ‘महफिल’

‘इमॅजिस्ट’ आयोजित Open Mic हा गझल, चारोळी, कविता, शायरी यांचा एकत्रित असा ‘महफिल’ हा कार्यक्रम ‘हाईड आऊट कॅफे’ येथे सम्पन्न झाला. विशाल पाटील, जयेश लोहाडे , RJ अदनान, सोहं सबनीस यांनी ‘महफिल’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात औरंगाबाद मधील नवलेखक सहभागी झाले होते, तसेच रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संजय जिनवाल, अभिजित पाटील, अंकिता, रुबिना, इशमत…

असा बनला मुंबईसह महाराष्ट्र !!

असा बनला मुंबईसह महाराष्ट्र !!

मुंबई : आज २१ नोव्हेंबर… १९५६ साली आजच्याच दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी चळवळ उभारली गेली. त्या चळवळीला आज ६६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. या हुतात्म्यांनी केलेल्या त्यागामुळे तत्कालीन सरकारला मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली. आजच्या या दिवसाचे औचित्य काय? ही चळवळ नेमकी काय होती? मुंबईसह महाराष्ट्र…

Business : ‘स्त्री उद्योग वर्धीनी’चा कल्याणी पुरस्कार ‘सोहं गृह उद्योग’ला

Business : ‘स्त्री उद्योग वर्धीनी’चा कल्याणी पुरस्कार ‘सोहं गृह उद्योग’ला

औरंगाबाद : मुंबईतील स्त्री उद्योग वर्धीनी या संस्थेद्वारे या वर्षीच्या चौथ्या राज्यस्तरीय ‘कल्याणी’ पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. औरंगाबादच्या सोहं गृह उद्योगला हा पुरस्कार मिळाला.  संचालिका सौ. निता श्रीपाद सबनीस यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  दरम्यान, यापूर्वी सोहं गृह उद्योगला ‘मसिआ’ने सन्मानित केले आहे. ज्या महिला जिद्दीने स्वतःचा व्यवसाय उभारतात आणि यशस्वीपणे चालवतात त्यांच्या कार्याचा गौरव…

परिसंवाद : नातेसंबंधात expiry असावी का ?

परिसंवाद : नातेसंबंधात expiry असावी का ?

आफताब आणि श्रद्धा यांच्यातील इश्कबाजी ते हत्याकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘खबरबात.कॉम’ द्वारे वाचकांसाठी खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात अनेक साधक-बाधक प्रतिक्रिया समोर आल्या. फेसबुकसह अन्य सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे १ हजार जणांनी सहभाग नोंदवला. पहिल्याच या अनोख्या उपक्रमास लाभलेला हा प्रतिसाद आम्हाला अतिशय आश्वासक वाटतो. या परिसंवादात सहभागी झालेल्या सर्व…

देवगिरी बँकेच्या कार्यशाळेने दिला, व्यावसायिकांना ‘Grow Up’ मंत्र

देवगिरी बँकेच्या कार्यशाळेने दिला, व्यावसायिकांना ‘Grow Up’ मंत्र

औरंगाबाद : महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा देवगिरी नागरी सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत कर्जवाटप केलेल्या कर्जदारांसाठी व्यवसायवाढ मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली. सदर कार्यशाळेत व्यावसायिकांना व्यवसाय वाढ आणि विस्तारासाठी ‘Grow Up’ चा मूल मंत्र देण्यात आला. देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, संदीप पंडित, संचालिका श्रीमती जयश्री…

चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही : मकरंद अनासपुरे

चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही : मकरंद अनासपुरे

भोकरदन येथे मित्र मंडळाच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव. भोकरदन : चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही त्याचप्रमाणे स्वतः सुखवस्तू जीवन जगत असताना इतरांच्या जीवन जगण्यांचा जे विचार करतात तीच खरी माणुसकी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामाचे आयुष्यभर समाधान लागते असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भोकरदन येथे ॲड. हर्षकुमार जाधव मित्र मंडळाच्या…

Bharat Jodo : देश-विदेशातून ‘भारत जोडो’साठी यात्री दाखल

Bharat Jodo : देश-विदेशातून ‘भारत जोडो’साठी यात्री दाखल

नांदेड :  देश – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य जनता भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीस काँग्रेस यूएसएचे अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील आयओसी युरोप संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेकरूंसोबत सामील होण्यासाठी आले होते. अमेरिकेहून भारतात खास भारत जोडो पदयात्रेसाठी आल्याचे त्यांनी सांगितले….