khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

छ. संभाजीनगर नव्हे, औरंगाबादच !

औरंगाबाद aurangabad शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. मात्र या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अंतिम न्यायनिवाडा होईपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर राज्य सरकारने न्यायालयाला औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर म्हणून वापरणार नसल्याची ग्वाही दिली.

राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले होते. मात्र या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याची सुनावणी अद्याप पूर्ण झाली नसून निर्णय होईपर्यंत नामांतर बाबतीत कोणतीच कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

शिंदे सरकारने दिली स्थगिती
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद aurangabad चे नामांतर करण्याच्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्याकडे बहुमत नसल्याचे सांगत शिंदेंनी या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर १६ जुलैला पुन्हा बैठक घेत छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्याचे जाहीर केले होते.

MIM चा विरोध
एमआयएमने उस्मानाबाद आणि औरंगाबाद aurangabad च्या नामांतराला जोरदार विरोध केला. त्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात मोठा मोर्चा काढत शक्तिप्रदर्शन केले होते. आगामी काळात मनपा निवडणूक असल्याने हा विरोध तीव्र होण्याची शक्यता आहे. १९९७ मध्ये नामांतराचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला होता. मात्र त्यावेळी कोर्टाने त्यास स्थगिती दिली नव्हती.

आपल्या गावची बातमी : khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like