khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

ST चा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वीच !

मुंबई : एस. टी. कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होणार आहे. राज्य सरकारने या अनुषंगाने तशी तरतूद केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. निर्धारित तारीख उलटून गेल्यानंतरही पगार होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, राज्य सरकारने वेतनासाठी ३२० कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीलाच ऍडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्मचाऱ्यांना सवलतीपोटी मिळणारे २२० कोटी आणि अतिरिक्त १०० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार महामंडळाला महिन्याच्या सुरुवातीलाच देणार आहे. एकूण ३२० कोटी रुपये वेतनासाठी सरकारकडून अग्रीम देण्यात येणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या सात तारखेपर्यंत होऊ शकतो.
अर्थ, परिवहन आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एसटीकडून विविध प्रकारच्या २९ सवलती दिल्या जातात, ज्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पुरस्कार प्राप्त व्यक्तींसारख्या सवलतींचा समावेश आहे.

दरम्यान, अर्थ विभागाकडे थकित असलेल्या १ हजार कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगारासाठी ३६० कोटी रुपये मिळायला हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्याने महामंडळाने अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकित रक्कम मागितली होती.

अर्थ विभागाने एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशोब देण्यास सांगितले आहे. एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला ७ ते १० तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारने कोर्टात दिले. मात्र दर महिन्यात पगार उशीरा होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. याशिवाय महामंडळावर संघटनांकडून कोर्टाच्या अवमानाच्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

तुमच्या उपयोगाची बातमी- khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like