नवी दिल्ली : khabarbat News Network
मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांसाठी लागणा-या औषधांच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता आहे. या श्रेणीतील औषधांच्या किमती १.७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने औषधांच्या किमतीत केलेल्या वाढीचा परिणाम दोन ते तीन महिन्यानंतर दिसून येईल. तीन महिन्यांचा साठा आधीच असल्याने सुरुवातीला रुग्णांना याचा फटका बसणार नाही.

महागाईचा मोठा फटका आरोग्य क्षेत्राला बसणार आहे. सरकार कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि एंटीबायोटिक यांसारख्या आवश्यक औषधांच्या किमती वाढवली जाण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे सरचिटणीस राजीव सिंघल यांनी औषधांच्या किमती वाढल्याने औषध उद्योगाला दिलासा मिळू शकणार आहे, फार्मा उद्योगात कच्च्या मालाची किंमत आणि इतर खर्च वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली.