NCP : जयंत पाटील म्हणाले, जातीनिहाय जनगणना करा; राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये जात जनगणनेचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर संपूर्ण देशात याच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही जण हे तोट्याचे असल्याचे म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी या अहवालावरून राजकारण तापले आहे. या विषयावर आतापर्यंत काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याचे समर्थन केले असनू यावर आपले मत मांडले…