
Hurun Wealth | अब्जाधीशांच्या संख्येत देशात महाराष्ट्र अग्रेसर
नवी दिल्ली : प्रतिनिधी भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत वाढ होत असून श्रीमंतांच्या यादीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे ‘हुरून वेल्थ’च्या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, भारतातील श्रीमंत घरांची संख्या जवळपास २०० टक्के वाढून ८,७१,७०० झाली आहे. ८.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त नेटवर्थ असलेल्या अशा कुटुंबांची संख्या २०२१ मध्ये ४,५८,००० होती. हे प्रमाण दुपटीने वाढले असून, देशातील एकूण घरांच्या ०.३१ टक्के