khabarbat

khabarbat logo

Join Us

chagan bhujbal

Advertisement

OBC : महाराष्ट्रात आता मराठा कोणी राहणार नाही !

 

राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी (OBC) होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात आली आहे. पण, आता त्याचा काही फायदा होणार नाही. कारण, सर्व मराठा लोक (OBC) कुणबी होत आहेत. त्यामुळे आता बाहेर कोणीच राहणार नाही. मागासवर्गातील सर्व लोक राजीनामा देत आहेत. कारण आता ओबीसीचा आयोग राहिलेला नाही तर मराठा आयोग झाला आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.

हरिभाऊ राठोड ओबीसी (OBC) मध्ये फूट पाडण्यासाठी कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत. आता ज्याप्रमाणे दादागिरी करुन खोटी सर्टिफिकेट घेत आहेत. त्याप्रमाणे पुढेही असेच होणार आहे. कोणी फोन करुन , दादागिरी करुन जात प्रमाणपत्र काढून घेतील. आता महाराष्ट्रात मराठा शिल्लक राहिलेला नाही, सगळ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे, असे भुजबळ म्हणाले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like